https://youtu.be/ajDPZV1hQEU

https://youtu.be/

Thursday, 30 March 2023

विश्वास पशुवर की माणसावर सुंदर बोधकथा 2023

 एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. 


त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही. 


शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला. 


हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला,


एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.


 तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.


पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली. 


वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ?


तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय."


माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखाली बसून होता.


 रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. 


हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."


 पण अस्वलानं तसं केलं नाही. 


थोड्या वेळानं माणसाला जाग आली. 


मग अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं ही संधी साधली.


 तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल."


माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला. 


सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते. त्यामुळे ते पडलं नाही. 


पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.


 ते म्हणालं, 

"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस.


 "पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."


ध्यानात ठेवा

पाठीत खंजर खुपसुन कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे, हे आपल्या हातात आहे.


ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.


सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणार्या असतात,याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही...


☝🏻☝🏻☝🏻☝🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

विनोदाचा बादशहा चारली चॅप्लिन

 आज तो दिवस आहे...जेव्हा चार्ली चॅप्लिन मरण पावला....त्यामुळे त्यांची 3 हृदयस्पर्शी विधाने आठवण्याचा एक चांगला दिवस: (1) या जगात काहीही शाश्वत नाही, अगदी आपल्या अडचणीही नाही.  (२) मला पावसात चालायला आवडते, कारण माझे अश्रू कोणीही पाहू शकत नाही.  (३) आयुष्यातील सर्वात वाया जाणारा दिवस म्हणजे ज्या दिवसात आपण हसलो नाही.  आयुष्य म्हणजे तुमच्या सोबत जे काही आहे त्याचा आनंद घ्यावा, हसत राहा...!  जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर स्वत:ला ब्रेक द्या.  थोडा आनंद घ्या.. आईस्क्रीम/चॉकलेट्स/कँडी/केक... का...?  B'Coz...: STRESSED बॅकवर्ड स्पेलिंग म्हणजे DESSERTS...!!  आनंद घ्या...!  खूप सुंदर ओळी कृपया संग्रहित करा.  एक चांगला मित्र हा एका चांगल्या औषधासारखा असतो...!  त्याचप्रमाणे एक चांगला गट म्हणजे एक पूर्ण मेडिकल स्टोअर...!!  जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर....: 1.सूर्यप्रकाश, 2.विश्रांती, 3.व्यायाम, 4.आहार, 5.आत्मविश्वास आणि 6.मित्र जीवनाच्या सर्व टप्प्यांवर त्यांची देखभाल करा आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या...!  चंद्र दिसला तर देवाचे सौंदर्य दिसले.....!  सूर्य दिसला तर...!  तुम्हाला देवाची शक्ती दिसते.... आणि.... जर तुम्ही आरसा पाहिला तर तुम्हाला देवाची सर्वोत्तम निर्मिती दिसते...!  तर, स्वतःवर विश्वास ठेवा.  आपण सर्व पर्यटक आहोत आणि देव आपला ट्रॅव्हल एजंट आहे ज्याने आपले सर्व मार्ग, आरक्षणे आणि गंतव्यस्थाने आधीच निश्चित केली आहेत.... त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जीवन नावाच्या "ट्रिप" चा आनंद घ्या...!!  आयुष्य पुन्हा कधीच येणार नाही.!!  आजच जगा..!  तुम्ही हे तुमच्यासाठी महत्वाचे असलेल्या सर्व लोकांना शेअर करू शकता..!!  🙏

Saturday, 18 December 2021

निवृत्त होईपर्यंत काम करा

 *निवृत्त होईपर्यंत   प्रमाणिकपने काम करणे...!! हेच सर्वोत्तम....*


 *एक सुतार काम करणारा ६० वर्षांचा माणूस होता तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला ४० वर्षे झाले होते...*


 ह्या ४० वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता...


 तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक ४० वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला निवृत्त व्हायचे आहे...


 आता मालक तर मालक असतात, जाता जाता सुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलच माहिती असते...


 तेंव्हा मालक त्या सुताराला म्हणतो ठीक आहे. तुला निवृत्त व्हायचंय तर तू होऊ शकतोस पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा, ते काम झाल्यानंतर तुझा छान पैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ....


 एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला...


 पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेन, पण अजून ३ महिने काम करावे लागणार होते...


 आतापर्यंत प्रत्येक काम मन लावून केले होते पण आता कसेतरी करायचे म्हणून तो काम करत होता. ज्या सुताराने आपल्या पूर्ण आयुष्यात सगळ्यात सर्वोत्तम घरे बनवली पण आता शेवटचे घर बनवताना त्याचे अजिबात मन लागत नव्हते...


 कसेतरी लाकडे कापायची, कसेतरी खिळे ठोकायचे, कसेतरी पॉलिशिंग करायचे असे करत करत तो घर बनवत होता...


 कसंबसं त्याने ते अर्धवट मनाने का होईना पण ३ महिन्यात घर पूर्ण केले. घर पूर्ण झाल्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो...


 झालं बाबा कसतरी असा तो विचार करतो. तो मालकाला जाऊन सांगतो, मालक घर पूर्ण झालं आहे. तेंव्हा मालक त्याच्याबरोबर घर बघायला निघतो. घर एकदम जवळ आलेले असताना तो मालक थांबतो त्या सुताराचा हात पकडतो आणि त्याच्या हातात त्या घराच्या चाव्या देत म्हणतो...


 हे जे घर तू बनवलं आहेस ते तुला मी माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. गेली ४० वर्षे तू माझ्याकडे जी मेहनत केलीस त्याचे फळ म्हणून हे घर मी तुला देत आहे. हे तुझे स्वतःचे घर होते जे तू बनवत होता...


 मित्रांनो विचार करा काय वाटले असेल त्या सुताराला...?? काय चालले असेल त्याच्या मनात...??


 मला कोणी सांगितले असते की हे माझे घर आहे तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट घर बनवण्याऐवजी मी सर्वोत्तम घर बनवले असते...


 अरे!!! कोणी मला सांगितले का नाही की हे माझे घर आहे. सांगितले असते तर एक एक खिळा, एक एक लाकूड, पॉलिश करताना मी हजार वेळा विचार केला असता आणि एक सर्वोत्तम घर बनवले असते. मी आता परत मागे सुद्धा जाऊ शकत नाही.



 का मी असे केले...??


 *"नोकरीचे असो नाहीतर इतर, कुठलेही काम आपण स्वतःसाठीच करतोय असे समजुन करा..."*


 *"आपल्यावर पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही...आणि चांगले काम केल्याचा आनंद आपल्याला कायमचा मिळेल...!!"*


 *सुंदर आहे ना कल्पना...!!*


 *कुठेही काम करा प्रामाणिकपणे करा आणि चांगले काम करा...चांगले काम केल्याचे फळ नेहमीच चांगले मिळते...!!*

Saturday, 23 May 2020

Moral story marathi

*⚜बोधकथा १६०*

*चिड़ियों से छुटकारा*

     एक राज्य के नागरिक बहुत परेशान थे।
पक्षी उनके खेत-खलिहान को बर्बाद कर दिया करते थे।
 एक बार अपना दुखड़ा लेकर वे राजा के पास पहुंचे।
उनकी परेशानी सुन कर राजा भी क्रोधित हो उठा।
उसने ऐलान किया कि राज्य के सारे पक्षियों को मार दिया जाए।

 और अब से जो सबसे ज्यादा पक्षी मारेगा, उसे पुरस्कृत किया जाएगा।
अब क्या था? होड़ मच गई पक्षियों को मारने की।
 उस साल खेत-खलिहान बच गए।
 धीरे-धीरे राज्य के सारे पक्षी समाप्त हो गए और लोगों ने राहत की सांस ली! राज्य में उत्सव मनाया जाने लगा।

 लेकिन अगले वर्ष जब लोगों ने अपने खेतों में अनाज बोया तो आश्चर्य कि एक दाना भी न उगा! उसका कारण यह था कि मिट्टी में जो कीड़े थे, उन्होंने बीज को ही खा लिया।
पहले पक्षी ऐसे कीड़ों को खा जाया करते थे और फसल की रक्षा स्वयं ही हो जाती थी।
लेकिन इस बार राज्य में कोई पक्षी ही नहीं बचा था, जो उन कीड़ों को नष्ट करता।

उस साल फसल नहीं हुई।

   राज्य में त्राहि-त्राहि मच गयी, भुखमरी के हालात पैदा हो गए।

 लोग फिर राजा के पास पहुंचे। उनका दुख सुन कर राजा को अपने निर्णय पर भी अफसोस हुआ।
 उसने नया आदेश दिया कि अब दूसरे राज्यों से पक्षी पकड़ का मंगाए जाएं।

बड़ी संख्या में पक्षियों के आने से स्थिति में सुधार हुआ तथा खेत-खलिहान फिर से लहलहाने लगे!
इस पृथ्वी तल पर जो भी रचना है, वह बेकार नहीं है।

विधाता ने बड़ी ही सूझ-बूझ से रचना की है और कहीं न कहीं प्रकृति के जीवन चक्र से जुड़ी है।
 इसे नष्ट करने की कोशिश कितनी खतरनाक होती है, यह हम वर्तमान में देख रहे हैं।

आज जंगलों से छेड़-छाड़ की, बड़े-बड़े वृक्ष काटे गए जिससे पशु-पक्षी कम हुए तथा अति-वृष्टि, अकाल का सामना करना पड़ा है।
सागर के साथ मनमानी तरीके से छेड़-छाड़ हुई, जिससे सैंडी लहरों की तबाही का मंजर देखने को मिला।

🚩🚩🚩

Thursday, 5 March 2020

Marathi bhasha

कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे. आणी तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे.

इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.

__________________
क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा

ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .
________________________

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

*मराठी बोला अभिमानाने*

Friday, 31 January 2020

[31/01, 7:10 AM] +91 98503 44235: *आई वडिल हयात असलेल्या मुलांनी वेळ काढून जरूर वाचावा*

खुपच चांगला मेसेज आहे कोणी लिहिला माहिती नाही चांगला आहे यासाठी शेयर करीत आहे !
         *आई-वडील*
 
आई + वडील = हेच जीवन

गणित खूप शिकलो पण हे आयुष्याचं गणित अनेकांना समजतं नाही !
० "आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?

० आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!

० तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!!

० "आई" तुमच्या
आयुष्याच्या गाडीचं योग्य
दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!!

० तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील"
म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!

० "आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!!

० "आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!!

० आणि कधी "नेटवर्क" थकले;
 तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
 आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!

० तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील"
हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "शिक्षणाचं  विद्यापीठ" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!

० तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशक गुरू असतो...!!!

० तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!

० "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!

० तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!

० "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!

० कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गं SSS" असतं...!!!

०आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!

० परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!!

० त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!

म्हणूनच म्हणतो...

० परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!!

त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं
०"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!

० "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असते...!!!

उगाचच नाही आपल्या संस्कृतीत
   "मातृ देवो भव"अन् "पितृ देवो भव" असे म्हणलेलं आहे...🙏 
आई - वडील असून सुद्धा जर ते आपल्या सोबत राहत नसतील तर या जगातील सर्वात महान सुखापासून तुम्ही वंचित आहात असे समजा !

 खरंच आई वडिलांच्या सेवेसाठी कधीही नाही म्हणू नका कारण जग हे पाहतोय ते आई -वडिलामुळेच🙏

        🌹 धन्यवाद 🌹
[31/01, 7:14 AM] +91 98503 44235: ✅शाहिस्तेखानला
रोज "डायरी" लिहिण्याची
सवय होती.

 त्या डायरीचे नाव
 "शाहिस्तेखान बुर्जी"
असे आहे...

 त्यामध्ये
"शिवरायांनी" केलेल्या
हल्ल्याचा प्रसंग
त्याने नमूद केलेला आहे.
आणि
याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.

तो असं लिहितो,
"शिवराय आले
तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले.
काही वेळाने गोंधळ थांबला.
 शाहिस्तेखानाची एक बहिण
 धावत धावत खानाकडे आली
आणि म्हणाली,
''भाईजान मेरी बेटी लापता हैं..!
मेरी बेटी लापता हैं भाईजान..!''

 त्यावेळी
 आपली बोटं छाटलेला
 शाहिस्तेखान
स्मितहास्य करत म्हणाला,

''शिवाजीची माणसं
तिला पळवणार नाहीतच,
पण...!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा...!

कारण....
 तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी
तिची काळजी घेईल...!

"अरे...!
इतका विश्वास दुश्मनालाही
 महाराजांच्या चारित्र्यावर...!"

अर्थात...
ती मुलगी तिथेच
एका पिंपात लपून
बसली होती,
नंतर ती सापडली.

मित्रांनो...
हि गोष्टं सांगण्याच
तात्पर्य एवढचं कि,
"आज या सबंध
भारतीय समाजाला
"शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान महापुरुषाच्या
 आदर्शाची खरी गरज आहे..!!!

छत्रपती......
शिवाजी महाराज कि जय..!!!

!!! - जय शिवराय !!!

👉🔴अमेरिकेच्या
बोस्टन विद्यापीठात.

"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू"
 हा १०० गुणांचा (मार्काचा ) पेपर
घेतला जातो...


👉🔵पाकिस्तानच्या
         पाठ्यपुस्तकात

"आदर्श राजा असा असावा"

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
धडा शिकवला जातो...


💥अनेक देशांमध्ये
'आदर्श राजे छत्रपतींचा'
 इतिहास अभिमानाने शिकवतात...


😔पण आमचं दुर्दैव.....

आमच्याकडे
शिवरायांचा इतिहास
 पुसण्याचाच प्रयत्न केला जातो...


गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या
भूमीत जन्म घेतल्याचा
तर...आदर्श ठेऊन शेयर करा...!



👉शिवाजी महाराज
जर मुसलमानांचे विरोधक असते

तर …

शिवाजी महाराजांच्या
 तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!


👉शिवाजी महाराजांच्या
 आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!



👉शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?

"सिद्दी हिलाल"....!



शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?

 "नूर खान"…. !





👉शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला---

"मदारी मेहतर"





शिवाजी महाराजांचा
 एकमेव वकील

''काझी हैदर"





👉शिवाजी महाराजांचे
एकमेव चित्र उपलब्ध आहे
 त्या चित्रकाराचे नाव

''मीर मोहम्मद"



आणि



👉 शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध करण्यासाठी
 वाघनख्या पाठवून देणारा…

"रुस्तुमे जमाल"
हा हि मुसलमान..!!!




जर एवढे मुसलमान अधिकारी
 शिवाजी महाराजांच्या
 सैन्यात असू शकतात
 तर...
शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक
असू शकतात काय..???



👉शिवाजी महाराजांचे
३१ अंगरक्षक (बॉडीगार्ड) होते.
त्यापैकी
१० मुसलमान होते..!



👉शिवाजी महाराजांनी
एकही मस्जिद पाडली नाही,
 एकही कुराण
जाळले नाही.

याचा
 गांभीर्याने विचार
या देशात
झाला पाहिजे...!


रायगड किल्ला राजधानी
 बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले.

महाराजांनी
 मंत्र्याला विचारले,
''जगदीश्वराचे मंदिर बांधले"
 पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी
'मस्जिद' कुठे आहे..?

मंत्र्याने विचारले
'' महाराज,
जागा दाखवा...!''

महाराजांनी आपल्या
 राजवाड्यासमोरील जागा
 दाखवली
 आणि
तेथे आपल्या
मुसलमान सैनिकासाठी
मस्जिद बांधून घेतली..!




👉🔴 हा इतिहास
 आपल्या देशात का
 सांगितला जात नाही ?

हा इतिहास
जर समाजापुढे गेला
तर...
या देशात
 सामाजिक दुरी निश्चित
 नाहीशी होईल...

👍कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,

"आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा आणि विचार करा .
शक्य तेवढा फॉरवर्ड करा..
लाईक आणि कमेंट करण्यापेक्षा शेयर
केले तर खुप आनंद होईल...