https://youtu.be/ajDPZV1hQEU

https://youtu.be/

Friday, 31 March 2023

माणुसकीचा झरा

 माणुसकीचा झरा


[Image 68.jpg]

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची सहल 26 मार्च  2023 रोजी अकलूज येथे सकाळी साडेनऊ वाजता पोहोचली. मुलांना भूका लागलेले होत्या ,म्हणून आम्ही नाष्टा करण्यासाठी एका हॉटेलवर उतरलो .त्या हॉटेलवर फक्त खिचडी आणि पुरी भाजी होती. सर्व विद्यार्थ्यांनी पुरीची मागणी केली पण गरम पुऱ्या उपलब्ध नव्हत्या त्या हॉटेल मालकाला आम्ही पुऱ्या बनवून देण्याची विनंती केली त्यांनी ती विनंती मान्य केली आणि पुऱ्या बनवायला सुरुवात केली .पण विद्यार्थ्यांना भूक लागली असल्यामुळे विद्यार्थी चुळबुळ करत होते मला अगोदर कशी पुरी मिळेल यासाठी ते रांग मोडून पुढे पुढे येत होते. ही बाब जवळच थांबलेल्या दोन व्यक्तींनी पाहिली आणि ते हॉटेल मालकाला येऊन म्हणायला लागले या विद्यार्थ्यांना लवकर पुरी द्या पण हॉटेल मालकाचा विलाज नव्हता, कसे बसे अर्ध्या पाऊण तासांमध्ये सर्व विद्यार्थी पुरी खाल्ल्या आणि काही विद्यार्थी डबल खिचडी  पण खाल्ली , नाश्ता करणार होतो पण जेवण झालं, हॉटेल मालकाला बिल विचारलं साडेबाराशे रुपये बिल झालं असं तो म्हणाला ,आम्ही बिल काढून देणार तेवढ्यात ते दोन व्यक्ती समोर आले आणि म्हणाले सर तुम्ही बिल देऊ नका आम्ही एक तास झालं इथं थांबलेलो आहोत ते फक्त तुमचे बिल देण्यासाठी.

आम्ही त्यांना विचारलं तुम्ही का बिल देता?ते आम्हाला सांगितलं मी लहान असताना सुद्धा असाच गरिबीतून वर आलेला आहे दिवसभरातून एक वेळेस सुद्धा जेवण मिळत नव्हतं ती  मला आठवण झाली.  कृपया हा नाष्टा माझ्याकडून स्वीकारा त्यांचा कष्टातलं जीवन वृत्तान ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं ,आणि ते सर्व बिल त्या  अकलूज  मधील व्यक्तिने दिला, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला .एक दोन रुपये साठी लोक भांडण करतात आणि हा ओळख  नसलेला व्यक्ती, काही संबंध नसलेला व्यक्ती ,साडेबाराशे रुपये बिल देतो आमच्या डोळ्आणि ते सर्व बिल त्या  अकलूज  मधील व्यक्तिने दिला, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला .एक दोन रुपये साठी लोक भांडण करतात आणि हा ओळख  नसलेला व्यक्ती, काही संबंध नसलेला व्यक्ती ,साडेबाराशे रुपये बिल देतो आमच्या डोळ्यात पाणी आलं सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित होऊन त्या व्यक्तीकडे पाहू लागले मी मनामध्ये विचार केला हे लोक आपल्यासाठी बाराशे तेराशे रुपये खर्च करतात तर आपण यांचा हार घालू सत्कार केला पाहिजे, म्हणून आम्ही हार आणून त्यांच्या सत्कार केला पण तो सत्कारही घेण्यास नकार देऊ लागली आणि त्यांना विनंती केली आपण आम्हाला एवढं सहकार्य केलात आमचा हा सत्कार स्वीकारा म्हणजे आम्हालाही समाधान वाटेल ते त्यांनी मानलं आणि सत्कार स्वीकारला, आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना टाटा करून ते निघून गेले.,( ते दोन व्यक्ती वर फोटोत आहेत त्यांचे नाव जाधव सर आहे)

 एके ठिकाणी कवी म्हणतो , गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, त्या कवीला माणूस भेटत नसेल म्हणून तो कवी माणूस शोधत असेल पण आम्हाला अकलूज मध्ये विद्यार्थ्यांना नाश्ता देणारा माणूस मात्र भेटला, जगात आणखीन सत्य, माणुसकी, विश्वास, जिव्हाळा ,आपुलकी ,या गोष्टी आहेत याचा परिचय आम्हाला पुनश्च झाला.  आणखीनहीं  माणसाच्या मनामध्ये माणुसकीचा झरा आहे हे मात्र नक्कीच  

लेखन:

मुर्किकर  सर  , जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हल्लाळी तालुका निलंगा जिल्हा लातूर


र-.

Thursday, 30 March 2023

विश्वास पशुवर की माणसावर सुंदर बोधकथा 2023

 एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. 


त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही. 


शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला. 


हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला,


एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.


 तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.


पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली. 


वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ?


तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय."


माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखाली बसून होता.


 रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. 


हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."


 पण अस्वलानं तसं केलं नाही. 


थोड्या वेळानं माणसाला जाग आली. 


मग अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं ही संधी साधली.


 तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल."


माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला. 


सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते. त्यामुळे ते पडलं नाही. 


पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.


 ते म्हणालं, 

"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस.


 "पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."


ध्यानात ठेवा

पाठीत खंजर खुपसुन कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे, हे आपल्या हातात आहे.


ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.


सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणार्या असतात,याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही...


☝🏻☝🏻☝🏻☝🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

विनोदाचा बादशहा चारली चॅप्लिन

 आज तो दिवस आहे...जेव्हा चार्ली चॅप्लिन मरण पावला....त्यामुळे त्यांची 3 हृदयस्पर्शी विधाने आठवण्याचा एक चांगला दिवस: (1) या जगात काहीही शाश्वत नाही, अगदी आपल्या अडचणीही नाही.  (२) मला पावसात चालायला आवडते, कारण माझे अश्रू कोणीही पाहू शकत नाही.  (३) आयुष्यातील सर्वात वाया जाणारा दिवस म्हणजे ज्या दिवसात आपण हसलो नाही.  आयुष्य म्हणजे तुमच्या सोबत जे काही आहे त्याचा आनंद घ्यावा, हसत राहा...!  जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर स्वत:ला ब्रेक द्या.  थोडा आनंद घ्या.. आईस्क्रीम/चॉकलेट्स/कँडी/केक... का...?  B'Coz...: STRESSED बॅकवर्ड स्पेलिंग म्हणजे DESSERTS...!!  आनंद घ्या...!  खूप सुंदर ओळी कृपया संग्रहित करा.  एक चांगला मित्र हा एका चांगल्या औषधासारखा असतो...!  त्याचप्रमाणे एक चांगला गट म्हणजे एक पूर्ण मेडिकल स्टोअर...!!  जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर....: 1.सूर्यप्रकाश, 2.विश्रांती, 3.व्यायाम, 4.आहार, 5.आत्मविश्वास आणि 6.मित्र जीवनाच्या सर्व टप्प्यांवर त्यांची देखभाल करा आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या...!  चंद्र दिसला तर देवाचे सौंदर्य दिसले.....!  सूर्य दिसला तर...!  तुम्हाला देवाची शक्ती दिसते.... आणि.... जर तुम्ही आरसा पाहिला तर तुम्हाला देवाची सर्वोत्तम निर्मिती दिसते...!  तर, स्वतःवर विश्वास ठेवा.  आपण सर्व पर्यटक आहोत आणि देव आपला ट्रॅव्हल एजंट आहे ज्याने आपले सर्व मार्ग, आरक्षणे आणि गंतव्यस्थाने आधीच निश्चित केली आहेत.... त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जीवन नावाच्या "ट्रिप" चा आनंद घ्या...!!  आयुष्य पुन्हा कधीच येणार नाही.!!  आजच जगा..!  तुम्ही हे तुमच्यासाठी महत्वाचे असलेल्या सर्व लोकांना शेअर करू शकता..!!  🙏

Saturday, 18 December 2021

निवृत्त होईपर्यंत काम करा

 *निवृत्त होईपर्यंत   प्रमाणिकपने काम करणे...!! हेच सर्वोत्तम....*


 *एक सुतार काम करणारा ६० वर्षांचा माणूस होता तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला ४० वर्षे झाले होते...*


 ह्या ४० वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता...


 तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक ४० वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला निवृत्त व्हायचे आहे...


 आता मालक तर मालक असतात, जाता जाता सुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलच माहिती असते...


 तेंव्हा मालक त्या सुताराला म्हणतो ठीक आहे. तुला निवृत्त व्हायचंय तर तू होऊ शकतोस पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा, ते काम झाल्यानंतर तुझा छान पैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ....


 एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला...


 पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेन, पण अजून ३ महिने काम करावे लागणार होते...


 आतापर्यंत प्रत्येक काम मन लावून केले होते पण आता कसेतरी करायचे म्हणून तो काम करत होता. ज्या सुताराने आपल्या पूर्ण आयुष्यात सगळ्यात सर्वोत्तम घरे बनवली पण आता शेवटचे घर बनवताना त्याचे अजिबात मन लागत नव्हते...


 कसेतरी लाकडे कापायची, कसेतरी खिळे ठोकायचे, कसेतरी पॉलिशिंग करायचे असे करत करत तो घर बनवत होता...


 कसंबसं त्याने ते अर्धवट मनाने का होईना पण ३ महिन्यात घर पूर्ण केले. घर पूर्ण झाल्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो...


 झालं बाबा कसतरी असा तो विचार करतो. तो मालकाला जाऊन सांगतो, मालक घर पूर्ण झालं आहे. तेंव्हा मालक त्याच्याबरोबर घर बघायला निघतो. घर एकदम जवळ आलेले असताना तो मालक थांबतो त्या सुताराचा हात पकडतो आणि त्याच्या हातात त्या घराच्या चाव्या देत म्हणतो...


 हे जे घर तू बनवलं आहेस ते तुला मी माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. गेली ४० वर्षे तू माझ्याकडे जी मेहनत केलीस त्याचे फळ म्हणून हे घर मी तुला देत आहे. हे तुझे स्वतःचे घर होते जे तू बनवत होता...


 मित्रांनो विचार करा काय वाटले असेल त्या सुताराला...?? काय चालले असेल त्याच्या मनात...??


 मला कोणी सांगितले असते की हे माझे घर आहे तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट घर बनवण्याऐवजी मी सर्वोत्तम घर बनवले असते...


 अरे!!! कोणी मला सांगितले का नाही की हे माझे घर आहे. सांगितले असते तर एक एक खिळा, एक एक लाकूड, पॉलिश करताना मी हजार वेळा विचार केला असता आणि एक सर्वोत्तम घर बनवले असते. मी आता परत मागे सुद्धा जाऊ शकत नाही.



 का मी असे केले...??


 *"नोकरीचे असो नाहीतर इतर, कुठलेही काम आपण स्वतःसाठीच करतोय असे समजुन करा..."*


 *"आपल्यावर पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही...आणि चांगले काम केल्याचा आनंद आपल्याला कायमचा मिळेल...!!"*


 *सुंदर आहे ना कल्पना...!!*


 *कुठेही काम करा प्रामाणिकपणे करा आणि चांगले काम करा...चांगले काम केल्याचे फळ नेहमीच चांगले मिळते...!!*

Saturday, 23 May 2020

Moral story marathi

*⚜बोधकथा १६०*

*चिड़ियों से छुटकारा*

     एक राज्य के नागरिक बहुत परेशान थे।
पक्षी उनके खेत-खलिहान को बर्बाद कर दिया करते थे।
 एक बार अपना दुखड़ा लेकर वे राजा के पास पहुंचे।
उनकी परेशानी सुन कर राजा भी क्रोधित हो उठा।
उसने ऐलान किया कि राज्य के सारे पक्षियों को मार दिया जाए।

 और अब से जो सबसे ज्यादा पक्षी मारेगा, उसे पुरस्कृत किया जाएगा।
अब क्या था? होड़ मच गई पक्षियों को मारने की।
 उस साल खेत-खलिहान बच गए।
 धीरे-धीरे राज्य के सारे पक्षी समाप्त हो गए और लोगों ने राहत की सांस ली! राज्य में उत्सव मनाया जाने लगा।

 लेकिन अगले वर्ष जब लोगों ने अपने खेतों में अनाज बोया तो आश्चर्य कि एक दाना भी न उगा! उसका कारण यह था कि मिट्टी में जो कीड़े थे, उन्होंने बीज को ही खा लिया।
पहले पक्षी ऐसे कीड़ों को खा जाया करते थे और फसल की रक्षा स्वयं ही हो जाती थी।
लेकिन इस बार राज्य में कोई पक्षी ही नहीं बचा था, जो उन कीड़ों को नष्ट करता।

उस साल फसल नहीं हुई।

   राज्य में त्राहि-त्राहि मच गयी, भुखमरी के हालात पैदा हो गए।

 लोग फिर राजा के पास पहुंचे। उनका दुख सुन कर राजा को अपने निर्णय पर भी अफसोस हुआ।
 उसने नया आदेश दिया कि अब दूसरे राज्यों से पक्षी पकड़ का मंगाए जाएं।

बड़ी संख्या में पक्षियों के आने से स्थिति में सुधार हुआ तथा खेत-खलिहान फिर से लहलहाने लगे!
इस पृथ्वी तल पर जो भी रचना है, वह बेकार नहीं है।

विधाता ने बड़ी ही सूझ-बूझ से रचना की है और कहीं न कहीं प्रकृति के जीवन चक्र से जुड़ी है।
 इसे नष्ट करने की कोशिश कितनी खतरनाक होती है, यह हम वर्तमान में देख रहे हैं।

आज जंगलों से छेड़-छाड़ की, बड़े-बड़े वृक्ष काटे गए जिससे पशु-पक्षी कम हुए तथा अति-वृष्टि, अकाल का सामना करना पड़ा है।
सागर के साथ मनमानी तरीके से छेड़-छाड़ हुई, जिससे सैंडी लहरों की तबाही का मंजर देखने को मिला।

🚩🚩🚩

Thursday, 5 March 2020

Marathi bhasha

कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे. आणी तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे.

इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.

__________________
क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा

ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .
________________________

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

*मराठी बोला अभिमानाने*